हसता हसता डोळे अलगत येतील भरुन ।
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन ।
कावरं-बावरं होण्यासारखं काही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही ॥
रस्त्यामध्ये दिसतात कितीतरी चेहरे येता जाता ।
एकसारखेच दिसु लागतिल सहज बघता बघता ।
अवतीभोवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ।
सृष्टीमध्ये दोनच जिव आणखी कोणी नसेल ।
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही ॥
कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥
-अमित कदम
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा